गुळुंचे, कर्नलवाडीत पावसामुळे पिकांचे नुकसान
वाल्हे, ता. ३१ : गुळुंचे व कर्नलवाडी (ता. पुरंदर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. ग्राम महसूल अधिकारी शरद लोंढे व कृषी अधिकारी श्रेयस भांबुरे यांनी पंचनामे करण्याचे कार्य सुरू ठेवले. पावसाचा तडाखा व ओलसर हवामान याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतांमध्ये जाऊन थेट पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
कृषी अधिकारी भांबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळुंचे व कर्नलवाडी परिसरातील जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित शेतांमध्येही पुढील काही दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून, नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल अधिकारी लोंढे आणि कृषी अधिकारी भांबुरे यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कार्याचे ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून कौतुक होत आहे. 
मिलेश निगडे यांनी सांगितले की, ‘‘शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या दोन्ही अधिकाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.’’
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले होते. मात्र महसूल व कृषी विभागाने दाखवलेली तत्परता आणि जबाबदारीमुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाविषयी विश्वास निर्माण झाला आहे. पंचनामे सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शासनाकडून लवकरच नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. 
- पृथ्वीराज निगडे 
05620
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

