राष्ट्रपिता गांधीजी यांचे विचार प्रत्येक समस्येवर उपाय : हजारे

राष्ट्रपिता गांधीजी यांचे विचार प्रत्येक समस्येवर उपाय : हजारे

पुणे, ता. २ : ‘‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी गांधी विचारांचा अंगीकार करण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने राळेगणसिद्धी येथे झालेल्या कार्यक्रमात हजारे यांना ‘गांधीयन फिलॉसॉफी ॲवार्ड’ प्रदान करण्यात आला. राळेगणसिद्धी येथे निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या पर्यावरण संमेलनावेळी हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत धिवरे आदी मान्यवर उपस्थित होते. हजारे म्हणाले,‘‘समाजाला उपयोगी असे काम करायला हवे. सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतील, आरोप-प्रत्यारोप होतील, पण त्यावर शब्दातून, टीकेतून उत्तर न देता आपल्या कार्यातून द्यावे.’’

32547

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com