वडिवळे पुलावर संरक्षक कठडे 
त्वरित बसविण्याची मागणी

वडिवळे पुलावर संरक्षक कठडे त्वरित बसविण्याची मागणी

कामशेत, ता. १६ : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या वडिवळे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील संरक्षक कठडा त्वरित बसवावा, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
वडिवळे जवळच्या या पुलावरून पावसाळ्यात पाणी गेले की, येथील नागरिकांचा शहराशी असणारा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. परंतु प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या पुलाच्या एका बाजूचा संरक्षक कठडा तुटला आहे. या भागातील अनेक तरुण रात्रपाळीच्या कामावरून ये-जा करीत असतात. पुलावर विजेची देखील कोणतीच सोय नाही. त्यात कठडा तुटल्याने जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत असल्याचे वाहन चालक नवनाथ शिरसट यांनी सांगितले. तसेच सरपंच नवनाथ राणे म्हणाले,‘‘कुठलाही अपघात होण्याअगोदर या पुलाची उंची वाढवावी व संरक्षक कठडे त्वरित बसवावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com