भारत इतिहास संशोधन मंडळात
‘पानिपतचा रणसंग्राम’वर व्याख्यान

भारत इतिहास संशोधन मंडळात ‘पानिपतचा रणसंग्राम’वर व्याख्यान

पुणे, ता. ९ ः इतिहासातील पराक्रमाच्या स्मृती जपणे, त्यातून धडा घेणे गरजेचे असते. इतिहासाचा अभ्यास करणे राष्ट्राच्या जिवंतपणासाठी महत्त्वाचे असते, असे मत इतिहास अभ्यासक व वक्ते अॅड. रवींद्र यादव यांनी व्यक्त केले. पानिपतवीर मानाजी पायगुडे सभेतर्फे पानिपत स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘पानिपतचा रणसंग्राम’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

भारत इतिहास संशोधन मंडळ येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इतिहास अभ्यासक अभिजित आंबेकर यांनी भूषविले. या वेळी यादव यांनी पानिपतच्या युद्धाचा इतिहास त्यातील बारकाव्यांसह ओघवत्या आणि रसाळ शब्दांत कथन केला. यादव म्हणाले, ‘‘पानिपताच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, असे म्हटले जाते. परंतु ते सर्वस्वी योग्य नाही. या युद्धात अहमदशाह अब्दालीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी सव्वा लाख बांगडी फुटली, असे म्हटले जाते. पानिपतचा रणसंग्राम हा लाख, सव्वालाख सैनिकांच्या बलिदानाच्या स्मृतींचा इतिहास आहे. अब्दालीने भारतावर अनेकवेळा आक्रमण केले. परंतु नंतर पुन्हा आक्रमण करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.’’ आंबेकर यांनीही या वेळी पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या दहा वर्षांत १७६१ नंतर मराठ्यांनी परत दिल्ली कशी काबीज केली, याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. मानाजी पायगुडे सभेचे कार्याध्यक्ष अरुण पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. तर विलास पायगुडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com