‘वृक्षतोडीसाठी सरकारच्या नियमांना हरताळ’

‘वृक्षतोडीसाठी सरकारच्या नियमांना हरताळ’

पुणे, ता. १२ : दोनशेच्या वर आणि पाच वर्ष वयोमानावरील वृक्षांची तोड करायची असेल, तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे असतानादेखील महापालिकेच्या धनकवडी आणि नगर रस्ता-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून जवळपास सातशेहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे हा राज्य सरकारच्या आदेशाचा भंग असून, वृक्ष प्राधिकरणाने त्यास मंजुरी देऊ नये, अशी मागणी नंदकुमार मंडोरा आणि किशोर रजपूत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दोनशेपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या वृक्षांची तोड करायची असेल, तर त्यास राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. सरकारचे असे आदेश असतानाही नगर रस्ता-वडगाव शेरी कार्यालयाने ४९३ वृक्ष तोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे, तर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने २१५ वृक्ष काढण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या दोन्ही प्रस्तावातील पन्नास टक्क्याहून अधिक वृक्ष हे पाच वर्ष आयुर्मानावरील आहेत. त्यामुळे ती तोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. ती न घेता हे प्रस्ताव मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे आयुक्तांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com