अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेली तरतूद तोकडी

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेली तरतूद तोकडी

रेल्वेसाठी केलेली तरतूद तोकडी ः शहा
पुणे, ता. १ ः अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र या घोषणेतून नेमके काय साध्य होणार हा प्रश्नच आहे. दरवर्षीप्रमाणे केलेल्या या घोषणा आहेत. प्रत्यक्षात रेल्वेसाठी केलेली आर्थिक तरतूद तोकडी आहे. अर्थमंत्र्यांनी प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला आहे.

शहा म्हणाल्या की, ‘‘तीन वर्षांत ४०० वंदे भारत रेल्वे निर्माण करणे शक्य नाही. त्यासाठी एलएचबी कोचची निर्मिती थांबवावी लागेल, तसेच परदेशातून अशा रेल्वे आणाव्या लागतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांना देण्यात येणार होत्या, त्या प्रत्यक्षात कुठे आहेत. दररोज प्रवासी जीव मुठीत धरुन प्रवास करतात. त्यांचा विचार करण्याची गरज होती.’’
-------------------------------
देशातील वाहतूकदारांची निराशा ः शिंदे
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टसचे संचालक बाबा शिंदे म्हणाले की, देशातील वाहतूकदारांतर्फे पंतप्रधान व वाणिज्य मंत्री यांना या अर्थसंकल्पात मालवाहतूक व्यावसायिकांवर टीडीएस आकारू नये, अशी विनंती करणारे पत्र दिले होते, परंतु केंद्र सरकारने याबाबत देशातील वाहतूकदारांची निराशा केलेली असून देशामध्ये महामार्गांचे जाळे मोठे निर्माण केले असले तरीही टोल प्लाझामुळे वेळेची बचत होत नाही, तसेच लॉजिस्टिक पार्कबाबत घोषणा केली आहे. मात्र या ठिकाणी वाहतूकदारांना कोणतेही सुरक्षा आणि पायाभूत सुविधा कशा देणार हा प्रश्न आहे. देशातील महामार्गांवर पार्किंग टर्मिनस यासह सुविधांबाबत कोणताही विचार केलेला नाही. या अर्थसंकल्पाने वाहतूकदारांची निराशा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com