महेश तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

महेश तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, ता. ६ : ‘‘मराठा इतिहास समजून घेण्यासाठी मोगल दरबारातील अखबारांचे अत्यंत महत्त्व आहे,’’ असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.

स्नेहल प्रकाशनच्या वतीने लेखक महेश तेंडुलकर यांच्या ‘मोघल दरबारच्या अखबारांमधील किल्ले’ भाग एक ते चार आणि ‘गढी म्हणजेच किल्ला’ या पुस्तकांचे प्रकाशन फारसी भाषेचे अभ्यासक राजेंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी बलकवडे बोलत होते. यावेळी प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले,‘‘नेमका इतिहास काय घडला, हे समजण्यासाठी आकड्यांसह माहिती खूप गरजेची असते. प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यासाठी दोन्ही बाजूंची वर्णने खूप महत्त्वाची ठरतात. या दृष्टीने मोगल दरबारातील अखबार अत्यंत महत्त्वाची आहेत. या अखबारांतून औरंगजेबाचा स्वभाव कळून येतो. प्रत्येक किल्ल्याचे मूळ नाव काय आणि औरंगजेबाने कोणते नाव ठेवले, हे या पुस्तकात दिले आहे. त्या आधारे आपल्याला किल्ल्याचा अभ्यास करता येतो. ब्रिटिशांनी येथे राज्य करण्यासाठी आधी आपल्या मनाचा ताबा घेतला. ब्रिटिशांचे राज्य आपले आहे, ही भावना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे इथल्या गड-किल्ल्यांपासून त्यांनी लोकांना तोडले.’’
जोशी म्हणाले,‘‘मोगल दरबारातील प्रत्येक घडामोडींची नोंद अखबारात केली जात असे. मोगलांच्या अधिकृत इतिहासात नसलेल्या अनेक गोष्टी या अखबारांतून कळतात,’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटपांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com