‘वंदे मातरम’च्या 
आठवणींना उजाळा

‘वंदे मातरम’च्या आठवणींना उजाळा

Published on

पुणे ः ‘कच्छ’च्या वाळवंटात, तळपत्या उन्हात ज्यावेळी आम्ही तिरंगा ध्वज फडकावला, त्यावेळी अक्षरशः शेकडो लोक स्वयंस्फूर्तीने गाण्याच्या चित्रीकरणात सहभागी झाले. तो अतिशय अविस्मरणीय अनुभव होता, अशा शब्दांत चित्रपट निर्माते भारत बाला यांनी संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या ‘वंदे मातरम या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टरतर्फे आयोजित १७ व्या ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’च्या शेवटच्या सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी ‘एडीआय’चे अध्यक्ष ए. सुब्रह्मण्यम आणि पुणे चॅप्टरचे प्रमुख ऋग्वेद देशपांडे उपस्थित होते. बाला म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांकडून भारताचे जे समृद्ध वर्णन मी ऐकले होते, ते या गाण्यातून दाखविण्याचा माझा मानस होता. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी मी आणि माझ्या पत्नीने १९९७ साली तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले होते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.