‘आहाराची भूमिका 
अत्यंत महत्त्वाची’

‘आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची’

भारतीय आहार पद्धती ही ऋतुनुसार बदलणारी आदर्श पद्धती आहे. मधुमेहाच्या व्यवस्थापनात आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी व्यक्त केले.

डॉ. नांदेडकर यांची सल्ला
- सर्वसामान्य व्यक्तीसाठी गोड, खारट, आंबट, तिखट आणि तुरट या चवींचा समावेश असलेला आहार आयुर्वेदाने सांगितला आहे.
- मात्र, मधुमेही व्यक्तीच्या आहाराच्या नियोजनामध्ये कोणता आहार घ्यावा, तो कसा घ्यावा आणि किती प्रमाणात घ्यावा हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत.
- शरीराला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आहार घेणे आवश्यक असले तरी त्याचे नियोजन योग्य प्रकारचे नसेल, तर मधुमेहाच्या व्यवस्थापनात बाधा निर्माण होऊ शकते.
- यासाठी मधुमेही व्यक्तींनी आहाराची पथ्ये न चुकता पाळावीत.
- साखर आणि गूळ या दोन्हीचा आहारातील समावेश मधुमेही व्यक्तींनी टाळणे आवश्यक असते.
- जेवणाच्या वेळा पाळणे, जेवताना वातावरण प्रसन्न ठेवणे, जेवताना टिव्ही किंवा मोबाईलचा वापर न करणे, शिळे अन्न न खाणे मधुमेहींसाठी अत्यंत आवश्यक असते.
- कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्व आणि खनिजे हे पाच घटक आपल्या अन्नपदार्थांमध्ये असतात आणि त्याचे योग्य नियोजन मधुमेहाचा सामना करताना महत्त्वाचे ठरते.

अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मधुसंवाद’ या उपक्रमांतर्गत ‘मधुमेह आणि आहार’ याविषयी डॉ. रवींद्र नांदेडकर बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुडविल इंडियाचे संस्थापक कालिदास मोरे, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त विलास नेवपूरकर उपस्थित होते. प्रास्ताविक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. नेवपूरकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com