कृत्रिम पद्धतीने फळे पिकविणे टाळा !

कृत्रिम पद्धतीने फळे पिकविणे टाळा !

पुणे, ता. १२ : फळांच्या व्यापाऱ्यांनो, तुम्ही कॅल्शिअम कार्बाईड (मसाला ) किंवा कायद्याने चुकीच्या ठरविलेल्या कृत्रिम पद्धतीने फळे पिकवीत असाल तर सावधान. कारण, अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नजरा आता तुमच्यावर आहेत. रासायनिक घटकांचा वापर करून पिकविलेल्या फळांचा थेट दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृत्रिम पद्धतीने फळे पिकविणे टाळा, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.

उन्हाळ्यात आंब्यांसह विविध फळे बाजारपेठेत येतात. पण, फळे पिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नैसर्गिकरित्या पिकलेली फळे खाण्यायोग्य असतात. त्यांची चव रुचकर असते. अशी फळे आरोग्यासाठी पौष्टिक ठरतात. मात्र, आता कृत्रिम पद्धतीने फळे पिकविण्यात येत असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमिवर ही सूचना ‘एफडीए’ने केली आहे.


कायद्याने केलेला प्रतिबंध
अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने अन्नसुरक्षा व मानके प्रतिबंध आणि विक्रीवरील निर्बंध नियमन २०११चे उपनियम २.३.५ नुसार कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी मसाला म्हणून ओळखणार जाणाऱ्या कॅल्शिअम कार्बाईडच्या वापरावर प्रतिबंध केला आहे.

काय धोका आहे?
कॅल्शिअम कार्बाईडमधून उत्सर्जित होणारा ऍसिटायलीन वायू हा फळे हाताळणाऱ्यांना सुद्धा घातक ठरू शकतो. तसेच त्यामधून उत्सर्जित होणारे आर्सेनिक व फॉस्फरस यांचे अंश फळांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात. म्हणून या रासायनिक प्रक्रियेने फळे पिकविण्यास प्रतिबंध केला आहे.

याला मान्यता
अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी इतर द्रव्याचा १०० ‘पीपीएम’ एवढी मात्रा वापरण्यास मान्यता दिली असून फळे पिकविण्यासाठी सुनियंत्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यास तसेच पिकांचा प्रकार व त्याची परिपक्वता लक्षात घेऊन इथेफॉन व इथेरील इत्यादींच्या वापरास परवानगी दिली आहे. या प्रक्रियेमुळे इथेलीन वायू हा फळातील स्वतःच्या इथलीन वाढीसाठी उद्दीपित करतो. तथापि असेही निर्देशित केले आहे की, तो असे पदार्थ फळांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये, असे ‘एफडीए’चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.

काय निरीक्षण आहे?
काही फळ विक्रेते प्रतिबंधित केलेला कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करतात किंवा निर्दिष्ट केलेला इथलीन वायूच्या स्त्रोतांमध्ये प्रत्यक्ष फळे बुडवून पिकवतात. त्यामुळे अशी फळे सेवनास असुरक्षित आहेत. फळे पिकविण्यासाठी प्रतिबंधितद्रव्याचा वापर करण्यास अथवा निर्धारितद्रव्याचा अयोग्य वापर केल्याचे निदर्शनास आल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २०११ व नियमानुसार सक्त व गंभीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असेही केकरे यांनी सांगितले.

मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
- चक्कर येणे
- वारंवार तहान लागणे
- चिडचिड होणे
- अशक्तपणा
- गिळण्यास त्रास होणे
- उलट्या
- त्वचेवर व्रण येणे


कॅल्शिअम कार्बाईड अथवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकविताला ग्राहकांच्या निदर्शनास आले आल्यास अन्नसुरक्षा आयुक्त किंवा प्रादेशिक संचालक, केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या कार्यालयास माहिती कळवावी. त्या आधारावर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करता येईल.

- शशिकांत केकरे,
सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com