हृदयविकाराच्या लक्षणांबाबत
जागरूकता हवी ः डॉ. जोशी

हृदयविकाराच्या लक्षणांबाबत जागरूकता हवी ः डॉ. जोशी

पुणे, ता. १० ः हृदयविकाराचे निदान लवकर होणे हे प्रभावी उपचारांसाठी आणि रुग्णाचे प्राण वाचविण्याची शक्यता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. व्यक्तींनी संभाव्य लक्षणांबाबत जागरूक राहिले पाहिजे आणि यातील कोणतेही लक्षण जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. वेळीच सजग झाल्यास, रुग्ण जीवनशैलीत आवश्यक ते बदल करून आणि आणि आहारात बदल करून हृदयविकारातून बरे होण्याची शक्यता वाढवू शकतात, असे प्रतिपादन मणिपाल हॉस्पिटल्समधील कार्डिऑलॉजी विभागाचे कन्सल्टन्ट डॉ. अभिजित जोशी यांनी येथे केले.
डॉ. जोशी म्हणाले, ‘‘ज्‍यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व, अनारोग्यकारक आहार, धूम्रपानाचे व्यसन किंवा बैठी जीवनशैली यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असतात, त्‍यांना हृयरोगाची शक्‍यता जास्‍त असते. त्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com