पावसाने उघडीप दिल्याने 
टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ

पावसाने उघडीप दिल्याने टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ

Published on

पुणे, ता. ११ : पावसाने उघडीप दिल्याने ३२ टँकरऐवजी आता ३५ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील आठवड्यापर्यंत ही संख्या ४४ होती. पावसाच्या आगमनानंतर टँकरची संख्या १२ ने कमी झाली होती. त्यामुळे ३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये आता नव्याने तीन टँकरची भर पडली आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७८ हजार २०९ नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिना पूर्णता: कोरडा गेल्याने पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातून शहरवासीयांना बसण्यास सुरुवात झाली होती. मात्र, जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन होत सुरुवातीचे आठ ते दहा दिवस पावसाची रिपरीप कायम राहिल्याने टंचाईच्या झळा कमी झाल्या. त्यातच ६ जुलैपासून जिल्हा प्रशासनाकडून ४४ टँकरपैकी १२ टँकर कमी करत ३२ टँकर सुरू ठेवण्यात आले. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा टॅंकरच्या संख्येत तीनने वाढ करीत ३५ टँकर सुरू करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या म्हणून ६ टँकरपैकी ३ टँकर कमी करण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा ६ टँकर सुरू करण्यात आले आहे.

तालुका - टँकर - गावे
आंबेगाव - १२ - १७
जुन्नर - ०६ - ०७
खेड - ११ - १७
पुरंदर - ०६ - ०६
एकूण - ३५ - ४७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.