प्रत्येक थेंबाचे करू संवर्धन...

प्रत्येक थेंबाचे करू संवर्धन...

Published on

पुणे, ता. २ : जागतिक तापमान वाढ असो वा हवामान बदल, हे विषय यापूर्वी केवळ चर्चांमध्ये असायचे. परंतु आता याचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. परिणामी पाण्याची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. अशातच जीवन असणाऱ्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मार्गस्थ झालेल्या पालख्या आणि आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने पुणेकरांनी जलसंवर्धनाची शपथ घेत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
नदी, नाले, ओढे यांच्यासह विहिरी, तलाव, धरणे अशा जलस्त्रोतातील पाणी स्वच्छ ठेवणे, त्यांची निगा राखणे हे नित्यकर्तव्य असल्याचे मानत नागरिकांनी शपथ घेतली. सकल प्राणीमात्रांसाठी, जीवसृष्टीसाठी पाणी हेच जीवन आहे, हे मानून त्याचे संवर्धन करण्याची ग्वाही यानिमित्ताने पुणेकरांनी दिली. वारीच्या निमित्ताने निसर्गाची सेवा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.