‘मनाचे श्लोक’ 
पाठांतर स्पर्धेचे आयोजन

‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन

Published on

पुणे, ता. ३ : समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक पाठांतर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे, अशी माहिती डॉ. राजीव नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी योगिता तोडकर, संजीव जावळे, शिल्पा नगरकर उपस्थित होते.
मनाचे श्लोक घराघरापर्यंत पोहोचावेत, ज्यामुळे पुढची पिढी घडण्यास मदत होईल. मुलांचे मनोधैर्य व मनोबल, पाठांतर, स्मरणशक्ती, शारीरिक बल वाढविण्यासाठी प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, अशी माहिती नगरकर यांनी दिली. या स्पर्धेची नावनोंदणी सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.