पीक कर्जाचे उदिष्ट 
वेळेत पूर्ण करावे

पीक कर्जाचे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे

Published on

पुणे, ता. ४ : ‘‘खरीप व रब्बी पीक कर्जाचे एकूण उद्दिष्ट ६ हजार ५०० कोटी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी वेळेत पूर्ण करावे,’’ असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बँकांना दिले.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’च्या एफआयडीडीचे व्यवस्थापक सुभान बाशा, ‘नाबार्ड’चे विनीत भट, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे महाव्यवस्थापक तथा जिल्हास्तरीय बँकर्सचे संयोजक अमित शर्मा, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी वृषाली सोनी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘ जिल्हास्तरीय बँकर्स समितीने सर्व डेटा योजनानिहाय, क्षेत्रनिहाय आणि विभागनिहाय स्वतंत्रपणे सादर करावा. बँकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप व विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठीचे नियोजन करावे. यावर्षीच्या कर्ज योजनेत २ लाख ५२ हजार कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये पीक कर्जाची खरीप व रब्बी हंगाम मिळून ५ हजार ५०० कोटीचे नियोजन करण्यात आले. ६ हजार ५०० कोटी पर्यंत उद्दिष्ट ठेवावे. तसेच मागील आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा १३२ टक्के म्हणजे ३ लाख १ हजार ५०३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळीही उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जाचे वाटप करण्यासाठी प्रयत्न करावा.’’
यावेळी वार्षिक पत आराखडा (२०२४-२५) पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.