विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा
पुणे, ता. ५ : बाणेर येथील द ऑर्किड स्कूल हिस्ट्री क्लब आणि क्वांटम फाउंडेशनच्या स्व. प्रकाशचंद्र सुराणा मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इतिहास’ या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. नववीच्या विद्यार्थ्यांना ‘भारताची स्थिती परकीय शक्तींच्या अधीन नसती तर अधिक चांगली झाली असती’ हा विषय देण्यात आला होता. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय पाठ्यपुस्तके... हिंदू राष्ट्रवादाची रणभूमी’ हा विषय होता. स्पर्धेत नववीतील विद्यार्थी मिहीर आपटे व अकरावीचा विद्यार्थी मिहीर भातलवांडे यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना ट्रस्टच्या पुष्पा प्रकाशचंद्र सुराणा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक डॉ. प्रतीक सुराणा, द ऑर्किड स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता कपूर, समन्वयक संजुक्ता सेन, अत्रेयी साहा आणि दिव्या भटनागर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.