घटस्फोटाचा दावा
तीन तारखांत निकाली

घटस्फोटाचा दावा तीन तारखांत निकाली

पुणे, ता. १ ः कौटुंबिक वादातून एकमेकांचे तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नसलेल्या प्रकरणात संमतीने दाखल झालेला घटस्फोटाचा दावा तीन तारखांत निकाली निघाला. या प्रकरणाचे गांभीर्य तसेच परिणामांबाबत पक्षकारांशी चर्चा करून अटींबाबत तडजोड करण्यात आली. त्यामुळे संबंधित जोडपे विभक्त झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा आणि अक्षय (दोघांची नावे बदललेली) असे घटस्फोट झालेल्या जोडप्याचे नाव आहे. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. त्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वाद आणि स्वभावातील भिन्नतेमुळे त्यांना एकत्र राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अक्षयने आशाविरुद्ध घटस्फोटासाठी रायगडमध्ये अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणात आशा या वकिलांमार्फत हजर झाल्या होत्या. त्यांनी अक्षय यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दिली होती. दोन्ही प्रकरणांत अक्षय यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र कदम यांनी बाजू मांडली. आशा यांच्यावतीने अॅड. राणी कांबळे सोनवणे यांनी युक्तिवाद केला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com