साहित्यातील मूल्ये समाजापर्यंत 
पोहचण्याची गरज : डॉ. गोसावी

साहित्यातील मूल्ये समाजापर्यंत पोहचण्याची गरज : डॉ. गोसावी

पुणे, ता. १ : ‘‘मराठी साहित्य हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार हे द्रष्टे असतात. समाजात परिवर्तन घडविण्याची क्षमता त्यांच्यात असते. समाजाच्या संबंधीचे विषय, प्रश्न साहित्यात मांडले जातात. त्याविषयी विश्लेषण करून साहित्यातील मूल्ये समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत. संशोधन समाजाला उपयोगी पडायला हवे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने पीएच.डी. कोर्सवर्कचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. केशव तुपे, आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वागत केले.
साहित्याचा अभ्यास करताना सामाजिकशास्त्रीय परिप्रेक्षातून विचार करायला हवा. साहित्यात येणारे समाज, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, आर्थिक, राजकीय इत्यादी आंतरविद्याशाखीय अनुबंध तपासायला हवेत, असे मत डॉ. देसाई यांनी व्यक्त केले. मराठी साहित्याचे संशोधन करताना भाषिक अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. कारण भाषा ही संस्कृतीचे जतन करत असते. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. म्हणून संशोधकांनी भाषेचे विविध आयाम शोधावेत, असे आवाहन डॉ. तुपे यांनी केले. प्राचार्य घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र समन्वयक डॉ. प्रवीण ससाणे, प्रा. डॉ. नाना झगडे, डॉ. वंदना सोनवणे, प्रा. अनिता गाडेकर यांनी या कोर्सवर्कचे संयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com