‘नेट झिरो’साठी लष्करही सरसावले

‘नेट झिरो’साठी लष्करही सरसावले

पुणे, ता. ४ ः जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी सर्वच देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतानेही २०७० पर्यंत ‘नेट झिरो’चे लक्ष ठेवले आहे. आता यात लष्करही सरसावले असून, दक्षिण मुख्यालयाच्या वतीने २०४७ हे वर्ष निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन वर्ष म्हणून साजरे करणार आहे.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे मॅपिंग आणि दक्षिण मुख्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण समाविष्ट आहे. मुख्यालयाच्यावतीने सौर ऊर्जेची क्षमता वाढविणे, २०३० पर्यंत झिरो लॅंड फिल प्रकल्प राबविणे, जल पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेणे, एलईडीचा वापर, इन बिल्ट सांडपाणी प्रक्रिया आदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com