अकरावीच्या प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ
पुणे, ता. ८ : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या विशेष फेरीमध्ये एकूण १५ हजार ३२० विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अलॉटमेंट देण्यात आली आहे. या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारपर्यंतची (ता. १०) मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील एकूण नऊ हजार ५४४ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १३ लाख १५ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत कला शाखेसाठी चार हजार ४३७, वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ९७९ आणि विज्ञान शाखेसाठी सहा हजार ९०४ असे एकूण १५ हजार ३२० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. त्यातील एकूण तीन हजार ५७९ विद्यार्थ्यांनी सोमवारी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला. त्यामध्ये ‘कॅप’ फेरीअंतर्गत एकूण तीन हजार २१८ इतके प्रवेश झाले आहेत. तर व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत ३६१ प्रवेश झाले आहेत.
मुंबई विभागात सोमवारी सुटी जाहीर केल्यामुळे ‘सर्वांसाठी खुल्या’ या विशेष फेरीमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.