हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवा ः डुडी
पुणे, ता. ६ : ‘केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून हे अभियान यशस्वी करावे,’ असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
‘हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा २ ते ८ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याबाबत आढावा बैठकीत या सूचना दिल्या.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा ९ ते १२ आणि तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सरकारच्या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अभियानाची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.