सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा ः सहस्रबुद्धे ‘पार्थसूत्र’ आणि ‘बो ॲण्ड बियाँड’ पुस्तकांचे प्रकाशन
पुणे, ता. ६ ः सध्याच्या काळातील संघर्षाची परिस्थिती बघता, जगातील सगळ्या घटनांकडे सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार झाला पाहिजे, असे मत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल लिखित ‘पार्थसूत्र’ आणि ‘बो ॲण्ड बियाँड’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी विनय सहस्रबुद्धे बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी तर पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक आनंद देशपांडे, प्रकाशक मधुर बर्वे आदी उपस्थित होते.
सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘‘महाभारतातील अर्जुन ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून ‘पार्थसूत्र’ या पुस्तकाची निर्मिती केली असून, लेखनाची प्रभावीपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.’’
कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आपल्या आयुष्यात अर्जुनावस्था येते, तेव्हा मनातील वैचारिक धागे कृष्ण बनून मार्गदर्शन करीत असतात. अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या नात्यात खूप वेगळेपण आहे. अर्जुनाने प्रश्न विचारले पण श्रीकृष्णाने उत्तर देणे सोडले नाही. संवाद न तुटणे हे दोघांच्या नात्यातील वैशिष्ट्य आहे.’’
लेखिका दलाल म्हणाल्या, ‘‘अर्जुन आणि त्या भोवतीचे महाभारत असे लिखाणाचे कथासूत्र आहे. आजच्या काळाशी अन्वयार्थ लावत केलेले लिखाण म्हणजे हे पुस्तक आहे. ’’
-------------
फोटो ः 57928
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.