‘टीईटी’बाबत पुनर्विचार करण्याची शिक्षक संघाची मागणी
पुणे, ता. ४ ः सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) निर्णयाविरोधात राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, तसेच केंद्र सरकारकडे या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाच्या महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
राज्यातील शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून मंगळवारी रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये राज्यभरातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत उपस्थित शिक्षक संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला दिलेल्या ‘टीईटी’ सक्तीच्या निर्णयामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून विविध स्तरांवर शिक्षकांवर अन्यायकारक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती समितीचे नेते उदय शिंदे, संभाजी थोरात, कार्यकारी राज्याध्यक्ष सचिन डिंबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने घेतलेल्या या भूमिकेविरोधात २४ नोव्हेंबरला राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही पुनर्विचार न झाल्यास संघ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती संघाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

