‘जनता उदासीन राहिल्यास पुढील काळ कठीण असेल’
पुणे, ता. १० ः ‘‘विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मतदान चोरीबाबत जे सांगितले आहे, ते सर्वांनी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. हा केवळ एका पक्षाचा विषय नाही, हा लोकशाहीचा विषय आहे. निवडणूक आयोग याबाबत उत्तर देत नसेल तर जनतेने हा विषय हाती घेतला पाहिजे. जनता उदासीन राहिली तर देशासाठी पुढील काळ हा कठीण असेल,’’ असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त बाळासाहेब थोरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या बाबतीत लोकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगत थोरात म्हणाले, ‘‘नेमके घडले काय हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. आयोगाला मतदार याद्या डिजिटल स्वरूपात देणे शक्य होते. पण ढीगभर कागदपत्रे दिली म्हणजे तुम्ही काहीतरी लपवत आहात. ४५ दिवसांमध्ये माहिती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतेही कागदपत्रे देऊ नये, असा निर्णय घेऊन या विधानसभेत तो राबविला गेला. पुरावे गोळा करायला उशीर लागला म्हणून या गोष्टीला उशीर झाला. पुरावे आता मिळाले म्हणून राहुल गांधी आता बोलत आहेत.’’
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्ष योग्य वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेईल. निवडणुका आल्यावर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसून चर्चा होईल,’’ असे ही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.