आदिवासींपासून अनेक योजना दूरच ः अशोक वुईके
पुणे, ता. ११ ः ‘‘नवा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभाग गावागावातील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम निश्चित करेल. आदिवासी गावपाड्यांमध्ये सरकारच्या बऱ्याच योजना अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीत,’’ असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सोमवारी केले, तसेच ‘‘या भागात रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमी तत्पर असेल,’’ असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ‘आदी कर्मयोगी विभागस्तरीय प्रशिक्षण’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, केंद्रीय जनजाती आयोगाचे सहसचिव, अमित निर्मल, केंद्रीय जनजाती मंत्रालयाचे संचालक दीपाली मासीरकर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त चंचल पाटील, जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव विभू नायर दृक-श्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
डॉ. वुईके म्हणाले, ‘‘आदिवासी समाज विकासापासून दूर आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काम करायचे असून या भागामध्ये मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. आदिवासी भागामध्ये लोकजागृती झाली पाहिजे, आता लोकांपर्यंत आपल्याला जावे लागणार आहे आदिवासी लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’’ विजय वाघमारे यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. दीपाली मासीरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.