‘जगातील चांगल्या घटना
लोकांपर्यंत पोहचण्याची गरज’

‘जगातील चांगल्या घटना लोकांपर्यंत पोहचण्याची गरज’

Published on

पुणे, ता. १० : ‘‘जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ व्यक्त केले.

लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी उपस्थित होते. हिरेमठ यांनी जोशी यांच्या लेखनशैलीची स्तुती केली. अभय कुलकर्णी यांनी संघ स्वयंसेवक व पत्रकार म्हणून देशभरात आलेल्या विविध अनुभवांचा ऊहापोह केला. उमा कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचारांतून निर्माण होणाऱ्या साहित्याकडे आता चांगल्या दृष्टीने पाहिले जात असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com