वाहतूक कोंडी सोडविण्याकडे लक्ष
पुणे, ता. २६ ः शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी वाहतूक शाखेत असलेल्या ३१ विभागांतील पोलिस निरीक्षक, तसेच सहायक निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित होते आहे. कात्रज, बाणेर, गणेशखिंड रस्ता, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांतील वाहतूक कोंडी विचारात घेत या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक ज्या भागात राहायला आहेत त्या भागात त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपघाताची घटना घडल्यास पोलिस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट द्यावी, असे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. वाहतूक पोलिसांचा जलद प्रतिसाद महत्त्वाचा आहे. वाहनचालकांसह नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी ३१ विभागांतील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या ते वास्तव्यास असलेल्या जवळच्या वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.
पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना
पावसाळ्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचते. तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकारदेखील घडले आहे. तसेच पावसामुळे वाहतूक विस्कळित होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून काम करावे, कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांशी महापालिका, तसेच अन्य यंत्रणांच्या संपर्कात राहावे, असे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
यामुळे करण्यात आल्या बदल्या
- वाहतूक कोंडी कमी व्हावी
- कोंडीच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांनी त्वरित पोचावे
- वाहतूक पोलिसांचा जलद प्रतिसाद मिळावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.