साडेआठ हजार वारकऱ्यांची १२० रुग्णवाहिकांद्वारे सेवा
पुणे, ता. ५ : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्यसेवा देत आहेत. आतापर्यंत आठ हजार ६४३ वारकऱ्यांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.
भारत विकास ग्रुपद्वारे (बीव्हीजी) १०८ रुग्णवाहिका सेवेची अंमलबजावणी केली जाते. वारकऱ्यांना तत्काळ आरोग्यसेवा मिळण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेने पंढरपूर येथे नियंत्रण कक्ष तयार केला आहे. त्याद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरीक्षण करून आरोग्यसेवा देण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. त्यांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी, अशी सूचना आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी केली होती. ‘बीव्हीजी’चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिल्या. त्याद्वारे १२० डॉक्टरांच्या माध्यमातून वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा देत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी, यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.