वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून दोन कोटी
पुणे, ता. ६ ः आषाढी वारीसाठी राज्य सरकारने पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यासाठी दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार २४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागाच्या दोन जुलै रोजीच्या निर्णयानुसार देहू-आळंदी येथून पंढरपूरपर्यंतच्या पालखी सोहळ्यादरम्यान, राज्य तसेच परराज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी व्यापक आरोग्य व्यवस्थेची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये मंडप, फर्निचर, स्वच्छतागृहे, औषध व सामग्री, वैद्यकीय कर्मचारी, सीसीटीव्ही आणि वीज व्यवस्था यांचा समावेश आहे. सरकारने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकानुसार, आरोग्य शिबिरासाठी मंडप उभारणीसाठी ४० लाख, डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांसाठी जेवण-नाश्ता व पाणी यासाठी ५० लाख, राहण्याच्या सुविधांसाठी ५० लाख, तर स्वच्छतागृह, फर्निचर, वाहतूक, वीज, सीसीटीव्ही, आकस्मिक खर्च इत्यादीसाठी उर्वरित ६६ लाख एवढा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून आवश्यक सामग्री व सेवा खरेदी करताना तांत्रिक निकषांचे पालन करून पारदर्शक निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना खर्चाचे नियंत्रण आणि देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
असा केला खर्च
- आरोग्य शिबिरासाठी मंडप उभारणीसाठी ४० लाख
- डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण-नाश्ता व पाणी यासाठी ५० लाख
- राहण्याच्या सुविधांसाठी ५० लाख
- स्वच्छतागृह, फर्निचर, वाहतूक, वीज, सीसीटीव्ही, आकस्मिक खर्च इत्यादीसाठी ६६ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.