नवीन दर निश्चित न झाल्याने डिसेंबरपर्यंत जुनेच जलदर
पुणे, ता. ११ : जलसंपदा विभागाकडून ठोक पाणीवापराचे पुढील तीन वर्षांसाठीचे (२०२५ ते २०२८) दर निश्चित न झाल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गेल्या वर्षाचेच दर येत्या डिसेंबरपर्यंत ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे सध्या तरी जलदरवाढीची स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरिकांवर पडणारा बोजा लांबणीवर पडला आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून दर तीन वर्षांनी जलदर जाहीर केले जातात. जलसंपदा विभाग यासाठी जलदर प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाकडे सादर करत असतो. मात्र, असा प्रस्ताव अद्यापही प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेला नाही. विभागाकडून २०२५-२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जलदर निश्चित करण्याचे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ते निश्चित करून अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर तो प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. अंतिम प्रस्ताव नसल्याने जलसंपदा विभागाने जून महिन्यात प्राधिकरणास विनंती करून जलदराला पुढील सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ही मागणी प्राधिकरणाने मान्य करत २०२४-२५चे जलदर येत्या डिसेंबरपर्यंत लागू करण्याचे आदेश प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धरणे यांनी काढले आहेत.
जलदर निश्चित करताना जलसंपदा विभागाकडून महागाई निर्देशांकामध्ये झालेली वाढ, सिंचन व्यवस्थापनाचा खर्च, प्रकल्पाचा देखभाल दुरुस्ती खर्च, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन आदी बाबींचा विचार करून ते निश्चित केले जातात. त्यामुळे पुढील तीन वर्षांचे जलदर निश्चित करताना त्यामध्ये १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.