शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन ः डॉ. म्हसे
पुणे, ता. १६ : ‘‘रिंगरोडसाठी लागणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल,’’ असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्या शेतकऱ्यांनी डॉ. म्हसे यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली, त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला सरकारकडून मिळणार आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘या रिंगरोडमुळे बहुतांश गावे मुख्य रस्त्यांशी जोडली जाणार आहेत. दळणवळणाच्या अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील. यासह भूसंपादनानंतर शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणाऱ्या जमिनीचे महत्त्वदेखील पूर्वीपेक्षा अधिक वाढणार आहे.’’
थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर आणि इन्सेंटिव्ह एफएसआय आदीबाबत शेतकऱ्यांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत रिंगरोड टप्पा एक आणि टप्पा दोन यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या वेळी ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सहआयुक्त हिंमत खराडे, अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.