बारा आॅगस्टपासून 
काश्मीर तिरंगा यात्रा

बारा आॅगस्टपासून काश्मीर तिरंगा यात्रा

Published on

पुणे, ता. ३० : इन्किलाब जयते आणि एक्स्प्लोइंडिया टुरिझम डेव्हलपमेंट यांच्यातर्फे १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘काश्मीर तिरंगा यात्रा – राष्ट्रीय एकात्मता’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील नागरिकांना पहलगाम येथे झाडे लावून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच, डल लेकवरील शिकाऱ्यांतून ‘जय हिंद’ ची रचना करण्यात येणार आहे. देशभरातून लहान मुलांकडून ‘लेटर टू काश्मीर’ या मार्फत पत्र लिखाणाचा उपक्रम राबवला जाणार आहे.
देशभरातील स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा, खासगी व्यावसायिक, तसेच सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी असे १०० हून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेद्वारे साहस, साथ आणि सद्भावना या मूल्यांचा प्रसार करण्यात येणार असून, १५ ऑगस्टला श्रीनगरमधील स्वातंत्र्यदिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती इन्किलाब जयतेचे अध्यक्ष विक्रांत सिंघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com