आजअखेर खडकवासल्यातून
पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग
पाच टीएमसी पाण्याचा 
खडकवासल्यातून विसर्ग

आजअखेर खडकवासल्यातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग पाच टीएमसी पाण्याचा खडकवासल्यातून विसर्ग

Published on

खडकवासला, ता. १० : खडकवासला धरणातून यंदा १९ जूनपासून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सलग २१ दिवस मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.‌ आजअखेर सुमारे पाच टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

धरणात आजअखेर १.११ टीएमसी म्हणजे ५६.२२ टक्के पाणीसाठा जमा आहे. धरणातून सोडलेले पाणी फक्त खडकवासला धरणात जमा झालेले पाणी आहे, तर खडकवासला धरण साखळीत सुमारे २० टीएमसी म्हणजे ६९.४८ टक्के पाणी जमा झालेले आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी आहे. पाच टीएमसी पाणी म्हणजे खडकवासला धरण दोन वेळा भरेल एवढे पाणी नदीत सोडले आहे.


खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले की, धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले की, धरणात येणारी आवक वाढते. त्यामुळे खडकवासला धरणाची पाण्याची पातळी ६० टक्के एवढी कायम ठेवली जात आहे. त्या व्यतिरिक्त जादा होणारे पाणी मुठा नदी आणि कालव्यात सोडले जाते. पाण्याची पातळी ६० टक्केवर स्थिर करुन पुराचे नियंत्रण केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com