
पुणे : पंढरपूर येथे जाण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याने महापालिका प्रशासन अन् लोकप्रतिनिधींनी बैठकांचा व पाहणी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. पण त्या तुलनेत सुधारणांची गती कमी असल्याने वारकऱ्यांना चांगले रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता गृहाच्या सुविधा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.