
फुलवडे - डोंगराळ भागात संपर्कासाठी मोबाईलला खूप महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे, फोर-जी सेवा असली तरी टू-जीची सेवा मिळणे, अशा अनेक कारणांमुळे मोबाईलधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘बीएसएनएल’ची ई-सिम सुविधा उपलब्ध नसल्याने फोनधारकांना ‘बीएसएनएल’ सोडून इतर कंपन्यांचे सिम घ्यावे लागत आहे.