वाहतुक पोलिसांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने निवारा केंद्रातील 800 नागरीकांची केली अन्नाची व्यवस्था

Traffic-Police
Traffic-Police
Updated on

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संचारबंदी लागू केल्याने कामगार, मजूर व बेघरांची निवारा केंद्रामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांच्या वाहतुक शाखेच्यावतीने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने निवारा केंद्रातील तब्बल आठशे लोकांना अन्न पुरवठा करण्यात आला आहे. 

शहरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे गावी निघालेल्या कामगार, मजुर व बेघर व्यक्‍तींची पुणे पोलिसांच्यामदतीने महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये निवारा केंद्र, महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. परंतु निवारा केंद्रातील नागरीकांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी निवारा केंद्रातील लोकांना अन्न पुरवठा करण्यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांशी संपर्क साधला. त्यानुसार, विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्‍वस्त सुनील चोरे यांनी 300 लोकांसाठी दोन वेळेचे जेवण, सुधीर तन्ना यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत 14 एप्रिल पर्यंत 500 लोकांच्या एकवेळेच्या जेवणाची जबाबदारी घेतली. पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या माध्यमातूनही सर्व निवारा केंद्रांना अन्न पुरवठा केला जात आहे. 

कोंढवा वाहतुक शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने झोपडपट्टीतील तीन ते चार गरीब व गरजु कुटुंबांना अन्नधान्याचे पॅकेट तिले, तसेच अन्य ठिकाणच्या 150 हून नागरीकांना अन्नधान्य पॅकेट दिले. समर्थ वाहतुक विभागाने 50 े 60 गरजु व गरीब व्यक्तींना अन्नाची पाकीटे दिली. 

परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस, महाराष्ट्र तरुण मंडळ, होनाजी तरुण मंडळ यांच्यामार्फत वेश्‍यावस्तीमधील देहविक्रय करणाऱ्या 500 महिलांना अन्नधान्य वाटप व भोजन वायवस्था करण्यात आली. याबरोबरच सकल जैन संघटनेच्यावतीनेही दिड टन धान्य देण्यात आले. 

'निवारा केंद्रामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांना सध्याच्या स्थितीमध्ये मदतीची गरज आहे. तरी शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा.'' असे आवाहन अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ.संजय शिंदे यांनी केले आहे. 

संचारबंदीमुळे शहरातील 500 हून अधिक तृतीयपंथी नागरीकांची जेवणाची गैरसोय होऊ लागली होती. त्याबाबत मंगलमुखी किन्नर चॅरीटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ.शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर शहरातील 27 ठिकाणच्या 500 तृतीयपंथीयांना शिधा, जीवनावश्‍यक वस्तु पुरविण्यासाठी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com