धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करा

धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करा
Published on

उरुळी कांचन, ता. २२ : पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करून बेकायदेशीर बोअरवेलवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला उघड्या आणि संरक्षक कठडे नसलेल्या विहिरी आहेत. यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. अशा विहिरींचे सर्वेक्षण करून तिथे संरक्षक भिंती किंवा जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील अनधिकृत प्लॉटिंगमुळे बोअरवेलचे प्रमाण वाढले असून भूजल पातळी खालावत आहे. काही ठिकाणी बोअरवेलचा वापर सांडपाणी सोडण्यासाठी होत असल्याने प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व बोअरवेलची नोंदणी करून बेकायदेशीर खोदकामावर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि भूजल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे वारघडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com