

उरुळी कांचन येथील आश्रम रस्त्यावर नित्य होणारी वाहतूक कोंडी
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गावातील सर्वसामान्य जनता व पंचक्रोशीतून येणारे नागरिक,व्यापारी,महिला,विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले असुन वाहतुकीची कोंडी, रस्त्यात होणारे अस्तव्यस्त अवैध पार्किंग सेवा रस्त्यावरील व गावातील अंतर्गत रस्त्यांवरील टपऱ्यांचे,हातगाड्यांचे,भाजी,फळ विक्रेते यांचे अतिक्रमण तसेच ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील विनापरवानगी वाढणारे बांधकाम,अतिक्रमण ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून नजरेआड होत आहे.नेमकी अर्थपूर्ण तडजोडीतून कारवाई केली जात नाही का ? कारवाई करण्याची हिम्मत होत नाही असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.