Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

40-Year-Old Bridge Declared Unsafe for Traffic: आंबेगाव तालुक्यातील वळती-मांगीरबाबा पूल ४० वर्षांनंतर जीर्ण अवस्थेत पोहोचला असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा  वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक
Updated on

नवनाथ भेके

निरगुडसर : सुमारे ४० वर्षांपूर्वी वळती-शिंगवे रस्त्यावर बांधण्यात आलेला वळती-मांगीरबाबा हा ओढ्यावरील पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक बनला आहे.संबधित कामाची निविदा निघून अडीच महिने झाले,सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश देऊन देखील ठेकेदार काम करेना,या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे मात्र प्रशासनाच्या आदेशानंतरही या पुलावरून वाहतूक सुरूच असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com