Water Tanker
sakal
पुणे - पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली असून, आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांबरोबरच दोन हजारांहून अधिक पशुधनांसाठीही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.