
पुणे : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्यामुळे पानशेत आणि खडकवासला धरणातून नदीतील पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. तर, खडकवासला धरणातून केवळ कालव्याद्वारे पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सिंचनासोबतच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला चार धरणांमध्ये शनिवारी (ता.22) सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा 28.02 टीएमसी (96.12 टक्के) झाला आहे. गतवर्षी 29.02 टीएमसी (99.54 टक्के) पाणीसाठा होता.
शनिवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 25 मिलिमीटर, वरसगाव 8 मिलिमीटर, पानशेत 7 मिलिमीटर पाऊस झाला.
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी :
टेमघर - 2.98 (80.86)
वरसगाव - 12.45 (97.07)
पानशेत - 10.65 (100)
खडकवासला - 1.94 (97.60)
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.