पुण्याला 25 दिवस पुरेल एवढे पाणी खडकवासल्यात जमा

File photo of Khadwasla Dam
File photo of Khadwasla Dam

पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरण साखळी क्षेत्रात गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे पाच दिवसांत एक टीएमसी वाढ झाली आहे. वाढलेले पाणी शहराला किमान 25 दिवस पुरेल. तसेच शेतीसाठी 8- 10 दिवसांचे पाणी जमा झाले आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.

गेल्या शनिवार व रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला होता. रविवारी मध्यरात्रीनंतर व सोमवार पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. खडकवासला येथे सकाळी सहा वाजेपर्यंत अवघा 8 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत येथे 43, वरसगाव येथे 45, टेमघर येथे 73 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

तसेच सकाळी सहापर्यंत खडकवासला धरणात सुमारे 0.49 टीएमसी म्हणजे 24.99 टक्के पाणीसाठा शिल्लक होता पानशेत धरणात 1.67 टीएमसी म्हणजे 15.71 टक्के, वरसगाव धरणात 0.81 म्हणजे 6.33 टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणातून 10.21 टक्के म्हणजे 2.98 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. 

नवीन एक टीएमसी पाणीजमा
चारही धरण क्षेत्रांत गुरुवारी 2.20 एवढा पाणीसाठा शिल्लक होता. आज सोमवारी सकाळी 2.98 टीएमसी झाला आहे. वाढलेला 0.780 व शहराला पिण्यासाठी व पालखीसाठी मिळून 0.220 टीएमसी पाणी असे मिळून एक टीएमसी पाणी जमा झाले आहे.

शहराला महिन्याकाठी सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. एक टीएमसी म्हणजे 25 दिवसांचे पाणी जमा झाले आहे तर शेतीसाठीचे एक आवर्तन सुमारे चार टीएमसीची आवश्यकता असते. एक टीएमसी आठ-दहा दिवसांचे पाणी जमा झाले आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com