खडकवासला धरणातून सुरू केलेले आवर्तन दोनच दिवसांत केले बंद

Khadakwasala-Dam
Khadakwasala-Dam
Updated on

किरकटवाडी - कालव्याच्या दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभाग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रात असलेल्या संभ्रमाचा फटका दौंड, इंदापूर व हवेली तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. रब्बी पिकांसाठी खडकवासला धरणातून रविवारपासून सुरू केलेले आवर्तन दोनच दिवसांत कालव्याच्या होणाऱ्या गळतीमुळे पाटबंधारे विभागाने बंद केले आहे.

खडकवासला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावरून केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेला पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी एक उपकालवा काढला होता. त्या उपकालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने व गेटच्या खालून टाकलेला सुमारे एक मीटर व्यासाचा सिमेंट पाइप फुटल्याने पाण्याची मोठी गळती होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. 

पाटबंधारे विभाग व सीडब्ल्यूपीआरएस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अगोदर दुर्लक्ष करणारे प्रशासन ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे खडबडून जागे झाले. बुधवारी (ता. १८) अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांसाठी कालव्याद्वारे सुरू केलेले आवर्तन तातडीने थांबवले आहे. पाणी सोडणे बंद केल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. प्रशासनाने लक्ष देऊन दुरुस्ती केली असती, तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते. ‘सीडब्ल्यूपीआरएस’ प्रशासन जबाबदारी झटकत आहे.  त्यामुळे खडकवासला धरणाचे पाणीच नको, अशी अरेरावीची भाषा त्यांच्याकडून वापरली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com