‘आयटी पार्कची कोंडी कशामुळे?’

IT-Park-Traffic
IT-Park-Traffic

हिंजवडी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, ती पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने होते, की अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, असा प्रश्‍न हिंजवडीकरांनी उपस्थित केला आहे. 

शिवाजी चौकापासून माणच्या फेज थ्रीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण व अस्ताव्यस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक विभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक असतानाही तेथे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. तसेच कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या डी मार्टसमोर मुख्य रस्त्यावर अनेक गाड्या, रिक्षा पार्क केलेल्या असतात. त्याकडेही वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात, असे आयटीयन्सचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेबाबत सोशल मीडियावर शेकडो आयटीयन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. याबाबत वाहतूक पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे म्हणाले, ‘‘आमच्याकडून कारवाई सुरू असते. मात्र, अपुरे मनुष्यबळ व क्रेनसारख्या वाहनांची कमतरता असल्यामुळे दंडात्मक कारवाई करावी लागते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com