

पुणे - गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५२९ झाडे तोडली जाणार आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. यात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वृक्षतोड न करता पर्यायी आराखड्याची अंमलबजावणी करा. तसेच या संदर्भात पुढील आठ दिवसांत बैठक बोलावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.