Coronavirus:  कामगार गावाकडे परतू लागल्याने वीस टक्के तूट

Coronavirus:  कामगार गावाकडे परतू लागल्याने वीस टक्के तूट
Updated on

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उद्योगनगरीतील कंपन्यांमधील कामगार आपल्या गावी परतू लागले आहेत. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कामगार परतण्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत गेले असल्याने उद्योगांना दर दिवशी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नोकरीसाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांचे कुटुंबीय चिंतेत आहे. व्हॉट्‌सॲप, फोनद्वारे संवाद साधत त्यांचे कुटुंबीय त्यांना तातडीने गावाला येण्यास सांगत आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनांनी घरी परतत आहेत. रेल्वेने काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या असल्या तरी अनेकजण मुंबई किंवा अन्य स्थानकावरून गाडी पकडून जात आहेत.

उत्पादनाला मोठा फटका
शहरातील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांपैकी निम्मे कामगार हे बाहेरच्या राज्यातील आहेत. दररोज दीड हजार कोटी रुपयांचे उत्पादन होते. मात्र, कामगारांची संख्या कमी होऊ लागल्याने ते प्रमाण आता बाराशे कोटी रुपयांवर आले आहे. कामगारांचा गावी परतण्याचा आकडा असाच वाढत राहिला तर औद्योगिक उत्पादनाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना होणारी चीनमधून होणारी कच्च्या मालाची निर्यात अनेक दिवसांपासून बंद असल्याने उत्पादन निर्मितीत अडचणी भेडसावत आहेत. आता कामगार गावी परतू लागल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. शहरात काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुमारे दोन लाख ३० हजारांपर्यंत असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील आहेत. 

उद्योजकांकडून खबरदारीचे उपाय
कोरोनामध्ये वाढ होत असली तरी कारखान्यात काम करताना कोणती खबरदारी घ्यायची याची सूचना उद्योगाच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना देण्यात येत आहे. कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. काम करताना कोणती खबरदारी घ्यायची याच्या सूचना त्याना दिल्या आहेत.

‘‘उद्योगनगरमधील कामगार गावी परतू लागल्याने औद्योगिक उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही गावाकडे न जाता इथेच थांबा, असे सांगून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’ 
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com