विमानाने आणलेले कामगार रेल्वेने पुन्हा त्यांच्या गावी

Workers Returning Home by Railway who came in pune by plane
Workers Returning Home by Railway who came in pune by plane

पुणे : हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कामगारांची टंचार्इ भासू लागली. त्यामुळे विमानाचे तिकीट काढून देत परराज्यातून ३५ कामगारांना पुण्यात आणले. त्यासाठी प्रत्येकी आठ ते १० हजार रुपये खर्च आला. मात्र आता पुन्हा हॉटेल बंद झाल्याने अॅडव्हान्स व रेल्वेचे तिकीट काढून देत त्यांना परत गावी पाठविण्याची वेळ आली असल्याचे हॉटेल व्यावसायिक अभिषेक शेट्टी यांनी सांगितले. अनलॉक सुरू झाल्यानंतर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी कामगारांची पुण्यात येण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे एरंडवणा परिसरात हॉटेल असलेल्या शेट्टी यांनी कामगारांचे विमानाचे तिकीट काढून देत त्यांना पुण्यात आणले होते. याबाबत त्यांनी सांगितले की, ‘‘अनलॉक सुरू झाल्यानंतर देशात सर्वत्र रेल्वे सुरू झाली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील ३५ कामगारांना त्यांच्या जवळच्या विमानतळावरून मुंबईचे विमान तिकीट काढले. त्यांच्या घरापासून विमानतळापर्यंत. त्यानंतर मुंबईत उतरल्यानंतर बसने पुण्यात येण्यासाठी आवश्‍यक ती सर्व व्यवस्था आम्ही केली होती. त्यासाठी प्रत्येक कामगारामागे आठ ते १० हजार रुपये खर्च आला. आता त्या सर्वांना आगावू रक्कम देत पुन्हा रेल्वेने त्यांच्या गावी पाठवले आहे.’’

शहरात सुमारे अडीच लाख हॉटेल कामगार आहे. त्यात कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेशसह विविध राज्यातील कर्मचाऱ्याचा आकडा मोठा आहे.

अजितदादांना सायकलवरून शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन

कुटुंबीयांचे फोन वर फोन :
एकाच हॉटेलमध्ये पाच ते दहा वर्षांहून अधिक काम करीत असलेले अनेक कामगार आहे. त्यामुळे त्यांनीच पुढेही काम करावे, अशी हॉटेल मालकांची इच्छा असते. एवढ्या वर्षांत मालकाचे कामगाराच्या कुटुंबीयांशी देखील चांगले संबंध निर्माण झालेले असतात. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने कुटुंबातील सदस्याला परत पाठवा, असे फोन हॉटेल चालकांना येत आहेत.

गेल्या चार दिवसांत ६० टक्के कामगार परतले :
हॉटेल सुरू झाल्यानंतर शहरातील एकूण संख्येपैकी सुमारे २० टक्के कामगारांना विमानाने पुण्यात आणण्यात आले होते. पण आता हॉटेल बंद असल्याने त्यांना येथे ठेवून काय करायचे असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत सुमारे ६० टक्के कामगार पुन्हा त्यांच्या गावी गेले आहेत, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशनकडून देण्यात आली.

हे वाचा - नऱ्हे येथे कोविड सेंटर आजपासून सुरू; वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

- शहरात सुमारे २० टक्के हॉटेल
- कामगारांना विमानाने पुण्यात आणले गेले होते
- हॉटेल बंद झाल्याने ६० टक्के कामगार पुन्हा गावी परतले
- अनेकांना हॉटेल चालकांनी आगावू रक्कम देवून गावी पाठवले
- कामगारांना परत पाठविण्यासाठी कुटुंबीय करताय फोन
- कामगार परत येतील की नाही याबाबत शंका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com