
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टवरुन हिंसाचार उसळला आणि दोन गट भिडले. यवतमधील बाजारपेठ बंद झाली आणि त्यानंतर परिसरातील विविध ठिकाणातील घरांना लक्ष्य करत त्यांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. तणावग्रस्त परिस्थितीमुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसेचा फटका यवतमधील आठवडी बाजारालाही बसला. दंगलीच्या अफवेमुळे शेतकरी अन् व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली, माल तसाच पडून राहिल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले.