

पुणे - ऊस गाळप हंगामापुरते मर्यादित राहणारे साखर कारखाने आता वर्षभर कार्यरत ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहेत. मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यानंतर देशभरातील ६३ साखर कारखान्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.