पुणे : पुणे शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुणे, मुंबईतून आपापल्या मूळ गावांकडे परतणाऱ्या सर्व व्यक्तींना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यासाठीची जबाबदारी संबंधित गावच्या ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. यासाठी पुणे आणि मुंबईवरून परतणाऱ्या सर्व व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासूनचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात हा विषाणू वेगाने पसरण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यातच शहरात राहत असलेल्या आणि वेल्हे तालुक्यात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने ही विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.